नगरसेवकपदी निवडीबद्दल त्रिवार अभिनंदन

जावळीतालुक्याचे सुपुत्र ता.सातारा श्री अंकुश बाबा कदम यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवडीबद्दल त्रिवार अभिनंदन 💐💐💐आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने भविष्यात ही अशीच यशस्वी वाटचाल होत राहो 🙏👍Ankush Kadam Ankush Babaमनःपुर्वक अभिनंदन #बाबा

Read More

महागावात कृषीदूतांकडून श्री घटेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

महागाव येथे राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषीदूत विद्यार्थ्यांनी आज श्री घटेश्वर मंदिर, महागांव परिसरात स्वच्छता अभियान राबविले. मंदिर परिसरातील कचरा संकलन, गवत व झाडाझुडपांची सफाई तसेच परिसर सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. मंदिर हे गावाचे श्रद्धास्थान असल्याने त्याची स्वच्छता व पवित्रता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच…

Read More

श्री क्षेत्र घुटकेश्वर महादेव मंदिरांत भक्तांची अलोट गर्दी.

दीपक गायकवाड – मोखाडा वाकडपाडा येथे महाशिवरात्र निमित्ताने श्री घुटकेश्वर महादेव मंदिरांत पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. येथील मंदिर समितीच्या वतीने महाशिवरात्री च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पायी दिंड्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात शिवशंभोचा भावगर्भ नामघोष करत मंदिरात पदार्पण केल्याने मंदिर परिसर अक्षरशः शिवमय झाला होता. यावेळी मंदिर समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी…

Read More

रविंद्र पानमंद यांच्या शेतात AI तंत्रज्ञानाचा वापर

(सांगवडे,ता.मावळ) रविंद्र पानमंद यांच्या शेतामध्ये अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे वापर करण्यात आला. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीतील आर्द्रता, हवामान स्थिती आणि पाणी व्यवस्थापन यांचे अचूक निरीक्षण केले जात आहे. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने जमिनीतील ओलावा (Moisture) तपासून पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन पाणी देण्याचे नियोजन अधिक…

Read More

पोलीस नावाच्या पाटीखाली मद्यधुंद वाहनचालकाचा धुमाकूळ; नवी मुंबईत भीषण अपघात

नवी मुंबई | प्रतिनिधी नवी मुंबईत ८ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरातील वाहतूक सुरक्षिततेवर आणि कायद्याच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ‘पोलीस’ अशी पाटी लावलेल्या एका इनोव्हा कारने अनेक वाहनांना धडक देत मोठा अपघात घडवून आणला. विशेष म्हणजे वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर घटना सायन–पनवेल महामार्ग…

Read More

औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी; तलासरीत मोठा साठा जप्त

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात दारू तस्करांनी नवी शक्कल लढवत औषधांच्या नावाखाली दारूची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलासरी तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ७ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यतिश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर…

Read More

पालघर जिल्ह्यात धान्य खरेदी प्रक्रिया सुरू; आदिवासी शेतकऱ्यांचा मर्यादित प्रतिसाद

पालघर | प्रतिनिधीपालघर जिल्ह्यात खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याची शासकीय प्रक्रिया सुरू असली, तरी प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात धान्य खरेदी होताना दिसून येत नाही. विशेषतः आदिवासीबहुल भाग असलेल्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी आणि डहाणू तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद मर्यादित राहिला आहे.राज्य शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत आधारभूत धान्य खरेदी केंद्रांमार्फत भात व इतर धान्याची खरेदी केली जाते. मात्र,…

Read More

शिंदे सेनेतील गटबाजीचा फटका; ऊर्मिला लाटे बॅनरबाजीतून गायब

मुरबाड | प्रतिनिधी उबाठा शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांना मुरबाड तालुक्यात गटबाजीचा फटका बसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये विशेषतः माजी उबाठा पदाधिकारी सौ. ऊर्मिला लाटे यांचे नाव पुढे येत असून, त्यांना अद्याप कोणतेही महत्त्वाचे पद न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुरबाड तालुक्यातील उबाठा शिवसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे सेनेत दाखल होऊन वर्ष…

Read More

राखीव जंगलातून फार्महाऊससाठी डांबरी रस्ता; परवानगी कोणी दिली?

मुरबाड | प्रतिनिधी मुरबाड तालुक्यातील खांडपे परिसरातील वनखात्याच्या राखीव जंगलातून फार्महाऊससाठी सुमारे दोन किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. वन्यप्राणी व पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घनदाट जंगलातून सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाच्या जागेतून रस्ता केल्याचा आरोप होत असून, यासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले…

Read More

नवी मुंबईत वाहनचोरीच्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश; ४३ चोरीची वाहने जप्त

नवी मुंबई | प्रतिनिधी नवी मुंबई आणि परिसरात वाढलेल्या दुचाकी व रिक्षा चोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, एकूण ४३ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वाहनांची किंमत ४६ लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नवी…

Read More
Copyright@2025. All rights reserved.