सिमेंटच्या बंधाऱ्याच पाणी अडविण्यास प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर
वाडा – वाडा तालुक्यात अनेक नद्यांचे जाळे असून शेकडोंच्या संख्येने ओहोळांचे जाळे आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मात्र तालुक्यात भीषण टंचाईची समस्या उद्भवणार असून लोकप्रतिनिधी व सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी निधीची केवळ लयलूट केल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्याचा पुरेसा साठा व्हावा म्हणुन पाणी आडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून गावागावात सिमेंट बंधारे उभारण्यात आले असून अनेक बंधारे बंद…
म्हसा यात्रेतील गुरांचा बाजार उठला ?
मुरबाड |प्रतिनिधीम्हसा यात्रा एकेकाळी बैलांच्या मोठ्या बाजारासाठी प्रसिद्ध होती. महाराष्ट्रभरातून शेतीपयोगी बैल, नांगर व शेतीची अवजारे विक्रीसाठी येथे येत असत. मात्र यंदा अवघ्या एका दिवसात गुरांचा बाजार उठल्याचे चित्र पाहायला मिळाले.शेती व्यवसाय तोट्यात गेल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून गोठ्यांत जनावरे उरलेली नाहीत. यात्रेत आलेले बहुतेक बैल हे शेतीसाठी नव्हे, तर हौशी लोकांच्या शर्यतीसाठीचे खिल्लारी…
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वाडा तालुक्यात बळी.
वाडा | प्रतिनिधीवाडा तालुक्यातील तिळशे गावाच्या हद्दीतील तिलशे कोदे दळवी पाडा येथे आज (दि. ४) सकाळी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका ४३ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणपत लक्ष्मण दळवी (वय ४३) असे मृत व्यक्तीचे नाव असून, रस्त्यावर तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नेमकी घटना…
कांबारे-वासिंद रस्ता धोकादायक पुलामुळे अवजड वाहनांसाठी बंद
दिपक साळुंखे – वाडावाडा तालुक्यातील कांबारे ते वासिंद हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू होती. मात्र, या मार्गावरील सावरोली गावाजवळील तानसा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने प्रशासनाने या रस्त्यावरून अवजड वाहनांना सक्तीने बंदी घातली आहे.सदर पुलाचे अधीक्षक अभियंता, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या तपासणीत पुलाची…
पी. एम किसान योजनेचा २२ वा हप्ता
केंद्र शासनाने सुरु केलेल्या पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६०००/ सहा रुपये मिळतात. देशभरात ९ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.पी. एम किसान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी PMKiSAN पोर्टल वर पात्रता तपासावी,असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येतो.योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी, अधिकृत फार्मर आयडी आणि आधार-बॅंक लिंक पूर्ण असणे अनिवार्य आहे तसेच जमीनीची माहिती…
महाराष्ट्रात नवीन रेशन कार्ड मिळणे अधिक सोपे
मुंबई -महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नवीन रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नवीन नियम लागू करत नवीन रेशन कार्डसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या निर्णयामुळे बनावट व अपात्र लाभार्थ्यांवर आळा बसणार असून खऱ्या गरजू कुटुंबांना लाभ मिळणार आहे.राज्य सरकारच्या माहितीनुसार, 1 जानेवारी…
एस.टी. बस स्थानक दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम; महामंडळाकडून मोठी घोषणा
मुंबई —महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील सर्व एस.टी. बस स्थानकांवर दर पंधरा दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा 31 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली. ही मोहीम बस स्थानकांचे आरोग्यदायी, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण राखण्यावर केंद्रित आहे.मोहीमेचा फोकस फक्त बसस्थानकांच्या मुख्य परिसरावरच नाही, तर स्थानकांच्या जवळच्या परिसर आणि प्रशासकीय इमारतींवरही…
महाराष्ट्रात रस्ते अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण चिंताजनक.
मुंबई-महाराष्ट्रात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत असून, ही बाब गंभीर चिंतेची ठरत आहे. राज्य परिवहन व गृह विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांत शहरी तसेच ग्रामीण भागात अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि शहरांच्या बाहेरील वेगवान मार्गांवर अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.अपघातांमागील…
रक्षकच बनले भक्षक?
पालघर/घोलवड:कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस खात्यालाच काळीमा फासणारी घटना पालघर जिल्ह्यातील घोलवड येथे उघडकीस आली आहे. घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक साहेबराव शिवाजी कचरे यांच्यावर ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालघर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.नेमकी घटना काय?लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), ठाणे यांच्याकडे…
