पाठीवर मारा, पोटावर नको! मुरबाडमधील गरीब हातगाडीवाल्यांवर पोलिसांची लाथ

मुरबाड प्रतिनिधी | जन मेट्रो वडापाव विकून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या गरीब हातगाडीवाल्यांवर येथील पोलिसांची कारवाई सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. एसटी स्टॅन्ड समोर हातावर पोट भरणाऱ्या टपरीवाल्यांवर महिन्यात दोनदा दंड आकारला जात असल्याने “पोट भरावे की दंड भरावे?” असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे वर्षभर बंद असलेले हे व्यावसायिक गेल्या महिनाभरापूर्वी…

Read More

विकासाच्या नावाखाली आदिवासी आणि शेतकऱ्यांचे विस्थापन आम्ही मान्य करणार नाही – डॉ. अजित नवले

वाढवण बंदर, कर्जमाफी, मनरेगा, रेल्वे व वनहक्कांवर स्पष्ट भूमिका किसान सभेचे राष्ट्रीय नेते डॉ. अजित नवले यांची विशेष मुलाखत जन मेट्रो | विशेष मुलाखत पालघरमध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांनी काढलेला लॉंग मार्च सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतो आहे. वाढवण बंदर, वनजमिनींचे हक्क, स्मार्ट मीटर, मनरेगा, रेल्वे प्रकल्प आणि कर्जमाफी या प्रश्नांवर…

Read More

पालघरमधील ‘लाल वादळ’ शांत! माकपचे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर निर्णय

पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) भव्य ठिय्या आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली आहे. चर्चेत काय ठरले? सलग…

Read More

पालघरमध्ये लाल वादळाचा मुक्काम!

आज आंदोलनाचा तिसरा दिवस; ११ वाजताच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: वाढवण बंदराचा विरोध आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) ऐतिहासिक ठिया आंदोलन आज (बुधवारी) तिसऱ्या दिवसात प्रवेश करत आहे. काल संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले ६० ते ६५ हजार शेतकऱ्यांचे हे ‘लाल वादळ’ सध्या पालघरच्या रस्त्यांवर ठाण मांडून…

Read More

मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर कूच करू; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

​पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: पालघरच्या भूमीवर पुन्हा एकदा लाल बावटा फडकला असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI-M) नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य ‘लॉंग मार्च’ने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. डहाणूच्या चारोटीतून सोमवारी (१९ जानेवारी) निघालेला हा विराट मोर्चा मासवणमार्गे आज (२० जानेवारी) संध्याकाळपर्यंत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात तब्बल ९० हजारांहून अधिक कष्टकरी, शेतकरी…

Read More

पालघरमध्ये १ लाख आदिवासी -शेतकऱ्यांचे वादळ! हक्कासाठी चारोटी ते पालघर पायी एल्गार

दिनांक: १९ जानेवारी २०२६ स्थान: चारोटी ते पालघर पालघर जिल्ह्यात आज एका ऐतिहासिक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) च्या नेतृत्वाखाली सुमारे १ लाख आदिवासी आणि शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. 🔥 आंदोलनाचे प्रमुख मुद्दे: ही लढाई फक्त मागण्यांसाठी नसून अस्तित्वासाठी आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: १. वनजमिनीचे हक्क: अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही आदिवासींना…

Read More

महाराष्ट्रातील 2026 महापालिका निवडणुका: मतदान, राजकारण आणि ‘शाई’ वाद

15 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये झालेल्या निवडणुकांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधींचे सरकार आणले. जवळपास तीन वर्षांनंतर प्रशासक राजवटीचा काळ संपला, ही या निवडणुकांची सर्वात महत्त्वाची बाब ठरली. मुंबई महापालिका केंद्रस्थानी या निवडणुकांचा केंद्रबिंदू ठरली मुंबई महापालिका (BMC). देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीचे वार्षिक बजेट मोठे असल्याने सर्वच राजकीय…

Read More

महाराष्ट्रात ‘अरुणोदय’ सिकलसेल तपासणी मोहीम सुरू

महाराष्ट्र सरकारने सिकलसेल अ‍ॅनिमियावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी ‘अरुणोदय’ विशेष आरोग्य मोहीम राज्यभर सुरू केली आहे. ही मोहीम 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबवली जात आहे. कोणासाठी आणि कुठे? ही मोहीम सिकलसेलचा धोका अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये, विशेषतः आदिवासी आणि ग्रामीण भागात राबवली जात आहे.यामध्ये 0 ते 40 वयोगटातील नागरिकांची मोफत तपासणी करण्यात…

Read More

सांगवडे गावात PRA उपक्रमाचे यशस्वी आयोजन

सांगवडे(मावळ) : ग्रामपंचायत व पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गावात सहभागात्मक ग्रामीण मूल्यमापन (Participatory Rural Appraisal – PRA) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून गावातील सामाजिक, आर्थिक व कृषीविषयक माहिती संकलित केली. कृषी कन्यांनी गावाचा सामाजिक व संसाधन नकाशा तयार करण्याचे काम केले असून या प्रक्रियेत गावचे…

Read More

शेताच्या बांधावरून राजकीय व्यासपीठापर्यंत : कुणबी समाजाचा बुलंद आवाज – विश्वनाथ पाटील

महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात शेतकरी, कष्टकरी आणि दुर्लक्षित समाजाचा आवाज ठामपणे मांडणारे नाव म्हणजे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील. गेली दोन दशके त्यांनी कुणबी समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला असून, त्यांच्या कार्यामुळे कुणबी सेना ही केवळ संघटना न राहता चळवळ बनली. संघर्षातून उभा राहिलेला नेतृत्वाचा प्रवास विश्वनाथ पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते म्हणून ओळखले जातात….

Read More
Copyright@2025. All rights reserved.