पालघर जिल्ह्यात सर्वत्र रोहयो मजुरांची 52 कोटी 54 लक्ष रुपये मजुरी प्रलंबित

श्रमजीवी आंदोलनाच्या पावित्र्यात….! धुळवडीच्या तोंडावर परवडमजूरांच्या आनंदावर विरजण दीपक गायकवाड – मोखाडा शिमग्याचा सण अक्षरशः उलटत आलेला असतानाही रोजगार हमी योजनेवर काम केलेल्या पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील मजुरांची तब्बल 52 कोटी 54 लाख रुपयांची मजुरी मागील काही महिन्यांपासून शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे हातावर पोट असणा-या मजुरांवर ऐन सणासुदीला उपासमारीची वेळ आलेली आहे.सन 2022 पासून दरवर्षी…

Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन वाशिममध्ये उत्साहात संपन्न!

वाशिम (दि. 28 फेब्रुवारी): महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून शेकडो पत्रकार, संपादक, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते…

Read More

28 फेब्रुवारी रोजी वाशिम येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे 27 राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन मुंबई

प्रतिनिधी/वाशिम : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता वैकंठधामवासी मातोश्री सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर वाटाणे लॉन वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार व पदाधिकारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर…

Read More

बारामती विमान दुर्घटना : ‘अपघात की घातपात?’ – रोहित पवारांचे गंभीर आरोप, चौकशीवर सवाल

बारामती येथे घडलेल्या खासगी विमान दुर्घटनेनंतर वातावरण आणखी तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत थेट सवाल उपस्थित करत, हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केला. मुंबई आणि दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर तपास यंत्रणांची हालचाल वाढली असली, तरी चौकशीची दिशा आणि गती संशयास्पद असल्याचा…

Read More

पोलीस नावाच्या पाटीखाली मद्यधुंद वाहनचालकाचा धुमाकूळ; नवी मुंबईत भीषण अपघात

नवी मुंबई | प्रतिनिधी नवी मुंबईत ८ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरातील वाहतूक सुरक्षिततेवर आणि कायद्याच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ‘पोलीस’ अशी पाटी लावलेल्या एका इनोव्हा कारने अनेक वाहनांना धडक देत मोठा अपघात घडवून आणला. विशेष म्हणजे वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर घटना सायन–पनवेल महामार्ग…

Read More

औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी; तलासरीत मोठा साठा जप्त

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात दारू तस्करांनी नवी शक्कल लढवत औषधांच्या नावाखाली दारूची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलासरी तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ७ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यतिश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर…

Read More

पालघर जिल्ह्यात धान्य खरेदी प्रक्रिया सुरू; आदिवासी शेतकऱ्यांचा मर्यादित प्रतिसाद

पालघर | प्रतिनिधीपालघर जिल्ह्यात खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याची शासकीय प्रक्रिया सुरू असली, तरी प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात धान्य खरेदी होताना दिसून येत नाही. विशेषतः आदिवासीबहुल भाग असलेल्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी आणि डहाणू तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद मर्यादित राहिला आहे.राज्य शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत आधारभूत धान्य खरेदी केंद्रांमार्फत भात व इतर धान्याची खरेदी केली जाते. मात्र,…

Read More

भारत–अमेरिका व्यापार करार : आर्थिक संधी की शेतकऱ्यांसाठी नवे संकट?

भारत आणि अमेरिका यांच्यात नुकताच जाहीर झालेला बहुचर्चित व्यापार करार देशाच्या आर्थिक व राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर या कराराची घोषणा करत भारतावरील ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ म्हणजेच परस्पर आयात कर २५ टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारने या कराराचे स्वागत करत तो…

Read More

नवी मुंबईत वाहनचोरीच्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश; ४३ चोरीची वाहने जप्त

नवी मुंबई | प्रतिनिधी नवी मुंबई आणि परिसरात वाढलेल्या दुचाकी व रिक्षा चोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, एकूण ४३ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वाहनांची किंमत ४६ लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नवी…

Read More

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; पालघरमध्ये महत्त्वाचा बोगदा पूर्ण

पालघर | प्रतिनिधी मुंबई ते अहमदाबाद प्रवास जलद, सुरक्षित आणि सोपा व्हावा यासाठी सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला पालघर जिल्ह्यात चांगली गती मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत दहाणू परिसरात एक महत्त्वाचा बोगदा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. ३ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील ‘माउंटन टनेल-६’ या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. याआधी जानेवारी महिन्यात ‘माउंटन टनेल-५’…

Read More