स्टोन क्रेशरच्या प्रदूषणाविरोधात सायले ग्रामस्थांचा ठराव; जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे

मुरबाड | प्रतिनिधी मुरबाड–माळशेज मार्गावरील सायले गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या स्टोन क्रेशरमुळे होणाऱ्या प्रदूषणातून शेतजमीन व नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी सायले ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे. या स्टोन क्रेशरला कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये, असा ठराव २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला असून, जिल्हाधिकारी याबाबत काय भूमिका घेतात याकडे…

Read More

वाडा नगरपंचायतीच्या नवनियुक्त सदस्यना अनावृत्त पत्र-

मोहन पाटील पवित्र वैतरणा नदीतिरी व संयुक्त ठाणे जिल्ह्याची नाभी म्हणावी अशा मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या, बारा बलुतेदार अलुतेदार व व्यापारीबहुल व्यापार पेठ म्हणजे वाडा नगर. स्वातंत्र्यापासून मागील 75 वर्षात तालुक्यात चार-पाच मोठे पूल, एमआयडीसी, कारखाने येण्याशिवाय भरीव कार्य दृष्टीस पडत नाही. द्रष्ट्या- विजनरी राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळेच देशाच्या आर्थिक राजधानीच्या वेशीवर असूनही, वाडा नगर आजही नळ…

Read More

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर : आदिवासी मुक्तीसाठी झगडलेले क्रांतिकारक जीवन

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर यांचे मूळ गाव मालाड, मुंबई (तेव्हाचे मुंबई उपनगर) हे होय. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1907 रोजी मुंबईतील मालाड येथे झाला. जन्माने मुंबईकर असल्या तरी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी व विक्रमगड या आदिवासी पट्ट्यातील जनतेसाठी वाहून घेतले. त्यामुळेच त्या “जन्माने मुंबईकर, पण कर्मभूमीने आदिवासी पट्ट्याच्या जननेत्या”…

Read More

जुन्नर पंचायत समिती निवडणूक २०२६ : कुसूर गणातून भाजपाचे अधिकृत उमेदवार निलेश चव्हाण!

जुन्नर:जुन्नर पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी कुसूर गणातून भारतीय जनता पार्टीने श्री. निलेश सुगंधा सीताराम चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाच्या वतीने त्यांना कमळ चिन्ह देऊन निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. निलेश चव्हाण यांचा जन्म निमगाव तर्फे म्हाळुंगे येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडज येथे, तर माध्यमिक शिक्षण श्री कुलस्वामी…

Read More

सत्ता, संयम आणि संकेत

शोककाळात घेतलेले निर्णय समाजाला काय सांगतात? लोकशाहीत सत्ता ही केवळ अधिकाराचे साधन नसते; ती जबाबदारी, संवेदनशीलता आणि नैतिकतेची कसोटीही असते. म्हणूनच सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींचे निर्णय केवळ कायदेशीर चौकटीत तपासले जात नाहीत, तर सामाजिक संकेत, परंपरा आणि जनभावनेच्या आरशातही पाहिले जातात. काही निर्णय वेळेमुळे योग्य ठरतात, तर काही निर्णय त्याच वेळेमुळे प्रश्नांकित होतात. महाराष्ट्राने अलीकडेच…

Read More

पालघरच्या मातीचा राष्ट्रीय गौरव : प्रजासत्ताकदिनी भिकल्या धिंडा यांना पद्मश्री प्रदान

दिपक साळुंखे जव्हार- देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना पालघर जिल्ह्याच्या डोंगरदऱ्यांतून आलेल्या तारपाच्या सुरांना आज प्रत्यक्ष राष्ट्रपातळीवर मान मिळाला. जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे ज्येष्ठ आदिवासी कलाकार आणि तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना २६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात प्रत्यक्ष पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही केवळ पुरस्कार घोषणा…

Read More

रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत तुर्भे वाहतूक शाखेचा जनजागृती कार्यक्रम

नवी मुंबई | प्रतिनिधी – विष्णु बुरे रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने तुर्भे वाहतूक शाखा, नवी मुंबई यांच्या वतीने प्रभात डेरी, तुर्भे येथे नागरिक व वाहनचालकांसाठी जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे हा होता. या कार्यक्रमात वाहनचालकांना दारू पिऊन वाहन चालवू नये, सिग्नल जंप…

Read More

जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर किसान सभेचे आंदोलन स्थगित.

नाशिक- नाशिक जिल्ह्यात शेतकरी व आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले अखिल भारतीय किसान सभेचे आंदोलन मंगळवारी तात्पुरते स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ठरलेल्या मुदतीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या आंदोलनाचे नेतृत्व अखिल…

Read More

पाठीवर मारा, पोटावर नको! मुरबाडमधील गरीब हातगाडीवाल्यांवर पोलिसांची लाथ

मुरबाड प्रतिनिधी | जन मेट्रो वडापाव विकून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या गरीब हातगाडीवाल्यांवर येथील पोलिसांची कारवाई सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. एसटी स्टॅन्ड समोर हातावर पोट भरणाऱ्या टपरीवाल्यांवर महिन्यात दोनदा दंड आकारला जात असल्याने “पोट भरावे की दंड भरावे?” असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे वर्षभर बंद असलेले हे व्यावसायिक गेल्या महिनाभरापूर्वी…

Read More

विकासाच्या नावाखाली आदिवासी आणि शेतकऱ्यांचे विस्थापन आम्ही मान्य करणार नाही – डॉ. अजित नवले

वाढवण बंदर, कर्जमाफी, मनरेगा, रेल्वे व वनहक्कांवर स्पष्ट भूमिका किसान सभेचे राष्ट्रीय नेते डॉ. अजित नवले यांची विशेष मुलाखत जन मेट्रो | विशेष मुलाखत पालघरमध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांनी काढलेला लॉंग मार्च सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतो आहे. वाढवण बंदर, वनजमिनींचे हक्क, स्मार्ट मीटर, मनरेगा, रेल्वे प्रकल्प आणि कर्जमाफी या प्रश्नांवर…

Read More