वाडा-मनोर मार्गावर अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका, कारवाईअभावी नागरिकांमध्ये संताप
पालघर | प्रतिनिधी – बापू वाघत वाडा-मनोर रस्त्यावरील पाली परिसरात पुन्हा एकदा मोठा अपघात होता होता टळल्याची घटना घडली असून, या मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर आठवड्यातून एक-दोन वेळा तरी अवजड वाहने अडकल्याच्या किंवा धोकादायक स्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. या मार्गावरून नियमबाह्य…
