भात खरेदी केंद्रे बंदच; हजारो शेतकऱ्यांचे धान्य व्यापाऱ्यांच्या घशात
मुरबाड | प्रतिनिधी भात पिकावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची यंदा मोठी कोंडी झाली असून, आदिवासी विकास महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचा फटका मुरबाड तालुक्यातील शेतकरीवर्गाला बसत आहे. राज्य शासन दरवर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून हमीभावाने भात खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देत असते. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिना उजाडूनही भात खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुरबाड…
