समुद्राकाठचा शांत साक्षीदार : वसई किल्ल्याची कहाणी
आज वसई किल्ल्यात पाऊल टाकलं, की पहिल्यांदा जाणवतो तो नीरव शांतपणा. भग्न भिंती, कोसळलेले बुरुज आणि झाडीत हरवलेले रस्ते पाहून सहज वाटतं—“इथे कधी तरी खरंच एक समृद्ध शहर वसलेलं होतं का?”पण होय, हाच वसई किल्ला एकेकाळी सत्तेचा, व्यापाराचा आणि समुद्री ताकदीचा केंद्रबिंदू होता. मुंबईपासून फारसं लांब नाही, पण इतिहासाच्या दृष्टीने हा किल्ला मुंबईपेक्षाही जुना आहे….
