पोलीस नावाच्या पाटीखाली मद्यधुंद वाहनचालकाचा धुमाकूळ; नवी मुंबईत भीषण अपघात

नवी मुंबई | प्रतिनिधी नवी मुंबईत ८ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरातील वाहतूक सुरक्षिततेवर आणि कायद्याच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ‘पोलीस’ अशी पाटी लावलेल्या एका इनोव्हा कारने अनेक वाहनांना धडक देत मोठा अपघात घडवून आणला. विशेष म्हणजे वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर घटना सायन–पनवेल महामार्ग…

Read More

औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी; तलासरीत मोठा साठा जप्त

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात दारू तस्करांनी नवी शक्कल लढवत औषधांच्या नावाखाली दारूची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलासरी तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ७ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यतिश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर…

Read More

पालघर जिल्ह्यात धान्य खरेदी प्रक्रिया सुरू; आदिवासी शेतकऱ्यांचा मर्यादित प्रतिसाद

पालघर | प्रतिनिधीपालघर जिल्ह्यात खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याची शासकीय प्रक्रिया सुरू असली, तरी प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात धान्य खरेदी होताना दिसून येत नाही. विशेषतः आदिवासीबहुल भाग असलेल्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी आणि डहाणू तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद मर्यादित राहिला आहे.राज्य शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत आधारभूत धान्य खरेदी केंद्रांमार्फत भात व इतर धान्याची खरेदी केली जाते. मात्र,…

Read More

शिंदे सेनेतील गटबाजीचा फटका; ऊर्मिला लाटे बॅनरबाजीतून गायब

मुरबाड | प्रतिनिधी उबाठा शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांना मुरबाड तालुक्यात गटबाजीचा फटका बसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये विशेषतः माजी उबाठा पदाधिकारी सौ. ऊर्मिला लाटे यांचे नाव पुढे येत असून, त्यांना अद्याप कोणतेही महत्त्वाचे पद न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुरबाड तालुक्यातील उबाठा शिवसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे सेनेत दाखल होऊन वर्ष…

Read More

राखीव जंगलातून फार्महाऊससाठी डांबरी रस्ता; परवानगी कोणी दिली?

मुरबाड | प्रतिनिधी मुरबाड तालुक्यातील खांडपे परिसरातील वनखात्याच्या राखीव जंगलातून फार्महाऊससाठी सुमारे दोन किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. वन्यप्राणी व पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घनदाट जंगलातून सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाच्या जागेतून रस्ता केल्याचा आरोप होत असून, यासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले…

Read More

भारत–अमेरिका व्यापार करार : आर्थिक संधी की शेतकऱ्यांसाठी नवे संकट?

भारत आणि अमेरिका यांच्यात नुकताच जाहीर झालेला बहुचर्चित व्यापार करार देशाच्या आर्थिक व राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर या कराराची घोषणा करत भारतावरील ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ म्हणजेच परस्पर आयात कर २५ टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारने या कराराचे स्वागत करत तो…

Read More

नवी मुंबईत वाहनचोरीच्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश; ४३ चोरीची वाहने जप्त

नवी मुंबई | प्रतिनिधी नवी मुंबई आणि परिसरात वाढलेल्या दुचाकी व रिक्षा चोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, एकूण ४३ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वाहनांची किंमत ४६ लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नवी…

Read More

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; पालघरमध्ये महत्त्वाचा बोगदा पूर्ण

पालघर | प्रतिनिधी मुंबई ते अहमदाबाद प्रवास जलद, सुरक्षित आणि सोपा व्हावा यासाठी सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला पालघर जिल्ह्यात चांगली गती मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत दहाणू परिसरात एक महत्त्वाचा बोगदा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. ३ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील ‘माउंटन टनेल-६’ या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. याआधी जानेवारी महिन्यात ‘माउंटन टनेल-५’…

Read More

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग २४ तास बंद; सुरक्षेपासून सेवांपर्यंत अपयश

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या औद्योगिक, आर्थिक आणि दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात या मार्गावर घडलेल्या घटनेने या ‘आधुनिक पायाभूत सुविधा’ व्यवस्थेची गंभीर उणीव उघड केली. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान तब्बल २४ तासांहून अधिक काळ द्रुतगती मार्ग पूर्णतः ठप्प राहिल्याने हजारो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. अपघात कसा…

Read More

भात खरेदी केंद्रे बंदच; हजारो शेतकऱ्यांचे धान्य व्यापाऱ्यांच्या घशात

मुरबाड | प्रतिनिधी भात पिकावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची यंदा मोठी कोंडी झाली असून, आदिवासी विकास महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचा फटका मुरबाड तालुक्यातील शेतकरीवर्गाला बसत आहे. राज्य शासन दरवर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून हमीभावाने भात खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देत असते. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिना उजाडूनही भात खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुरबाड…

Read More