जन मेट्रो | साप्ताहिक विशेष लेख: अभिमान की आत्मपरीक्षण?
जैन धर्म, विकास आणि निसर्ग यांतील विसरलेली समतोलरेषा कॉम्रेड. किशोर जैन मी जैन आहे.म्हणूनच आज मला केवळ इतरांना नाही, तर स्वतःलाही काही प्रश्न विचारावेसे वाटतात. आज आपल्या समाजात अनेक जण गौतम अदानी यांचा अभिमानाने उल्लेख करतात. याचं मुख्य कारण असं दिलं जातं की ते जैन आहेत. “आपला माणूस मोठा झाला”, “देशासाठी मोठं काम करतोय” अशी…
स्टोन क्रेशरच्या प्रदूषणाविरोधात सायले ग्रामस्थांचा ठराव; जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे
मुरबाड | प्रतिनिधी मुरबाड–माळशेज मार्गावरील सायले गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या स्टोन क्रेशरमुळे होणाऱ्या प्रदूषणातून शेतजमीन व नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी सायले ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे. या स्टोन क्रेशरला कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये, असा ठराव २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला असून, जिल्हाधिकारी याबाबत काय भूमिका घेतात याकडे…
वाडा नगरपंचायतीच्या नवनियुक्त सदस्यना अनावृत्त पत्र-
मोहन पाटील पवित्र वैतरणा नदीतिरी व संयुक्त ठाणे जिल्ह्याची नाभी म्हणावी अशा मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या, बारा बलुतेदार अलुतेदार व व्यापारीबहुल व्यापार पेठ म्हणजे वाडा नगर. स्वातंत्र्यापासून मागील 75 वर्षात तालुक्यात चार-पाच मोठे पूल, एमआयडीसी, कारखाने येण्याशिवाय भरीव कार्य दृष्टीस पडत नाही. द्रष्ट्या- विजनरी राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळेच देशाच्या आर्थिक राजधानीच्या वेशीवर असूनही, वाडा नगर आजही नळ…
हरीनाम सप्ताहाच्या माध्यमातून ग्रामीण भागात संतपरंपरा व मराठी संस्कृतीचे जतन
मुरबाड | प्रतिनिधी शहरी भागात वाढत चाललेला पाश्चिमात्य प्रभाव, बदलती जीवनशैली आणि मूल्यांची घसरण पाहता आपली मराठी संस्कृती लयास चालली की काय, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. एकेकाळी जुने कपडे शिवून अंग झाकणारी पिढी मागे पडत असून, नवे कपडे फाडून अंगप्रदर्शन करणारी पिढी पुढे येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात आजही संतपरंपरा, वारकरी संप्रदाय…
कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर : आदिवासी मुक्तीसाठी झगडलेले क्रांतिकारक जीवन
कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर यांचे मूळ गाव मालाड, मुंबई (तेव्हाचे मुंबई उपनगर) हे होय. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1907 रोजी मुंबईतील मालाड येथे झाला. जन्माने मुंबईकर असल्या तरी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी व विक्रमगड या आदिवासी पट्ट्यातील जनतेसाठी वाहून घेतले. त्यामुळेच त्या “जन्माने मुंबईकर, पण कर्मभूमीने आदिवासी पट्ट्याच्या जननेत्या”…
जुन्नर पंचायत समिती निवडणूक २०२६ : कुसूर गणातून भाजपाचे अधिकृत उमेदवार निलेश चव्हाण!
जुन्नर:जुन्नर पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी कुसूर गणातून भारतीय जनता पार्टीने श्री. निलेश सुगंधा सीताराम चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाच्या वतीने त्यांना कमळ चिन्ह देऊन निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. निलेश चव्हाण यांचा जन्म निमगाव तर्फे म्हाळुंगे येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडज येथे, तर माध्यमिक शिक्षण श्री कुलस्वामी…
सत्ता, संयम आणि संकेत
शोककाळात घेतलेले निर्णय समाजाला काय सांगतात? लोकशाहीत सत्ता ही केवळ अधिकाराचे साधन नसते; ती जबाबदारी, संवेदनशीलता आणि नैतिकतेची कसोटीही असते. म्हणूनच सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींचे निर्णय केवळ कायदेशीर चौकटीत तपासले जात नाहीत, तर सामाजिक संकेत, परंपरा आणि जनभावनेच्या आरशातही पाहिले जातात. काही निर्णय वेळेमुळे योग्य ठरतात, तर काही निर्णय त्याच वेळेमुळे प्रश्नांकित होतात. महाराष्ट्राने अलीकडेच…
विक्रमगड तालुक्यातील मान येथे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
विक्रमगड – शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २९ जानेवारी रोजी ५१ गरजू जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पडला. हा सोहळा मान आश्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आणि तुंगारेश्वर देवस्थानचे पूज्य बालयोगी सदानंद बाबा यांच्या आशिर्वादाने पार पडला.सोहळ्यात वाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, मोखाडा या…
लाडकी बहिण योजना : हप्ता रखडला, केवायसी दुरुस्तीसाठी अल्प मुदतीने महिलांचा गोंधळ
दिपक साळुंखेपालघर-राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणारा मासिक हप्ता अनेक भागांत अद्याप न आल्याने ग्रामीण व आदिवासी भागात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दैनंदिन खर्चासाठी या योजनेवर अवलंबून असलेल्या महिलांना हप्ता रखडल्याचा थेट फटका बसत असून, घरखर्च, औषधोपचार आणि मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेक लाभार्थी…
